पाली विभागातील शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे भर दिला पाहिजे : उद्योजक रवींद्र सामंत

0

पाली : पाली विभागात सेंद्रीय शेतीची चळवळ खऱ्या अर्थाने उभी राहते आहे. सोबतीला खानु खजिना या सारखाच ब्रँड प्रत्येक गावाने विकसित करून सेंद्रीय शेतीतून शाश्वत उत्पन्न घेऊन आर्थिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्याचसोबत कृषी विभागाने शेतकर्‍यांना योग्य  मूल्यांकन होईल असे मार्गदर्शन केले पाहिजे, असे प्रतिपादन उद्योजक रवींद्र सामंत यांनी पाली येथे केले. 

रत्नागिरी विभागातील पाली मंडळ कृषी विभागामार्फत पाली परिसरातील पाली, वळके, खानु, साठरे, नाणिज, कशेळी गावातील भाजीपाला उत्पादन घेणारे, प्रात्यक्षिक करणारे शेतकरी यांना जेष्ट उद्योजक रवींद्र सामंत, समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांच्या हस्ते भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी खानु सरपंच गणेश सुवारे, नाणिज सरपंच गौरव संसारे, कशेळी सरपंच, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी पर्यवेक्षक रघुनाथ डवरी, कृषी सहाय्यक सुरेश येजरे, सुनिल कुरंगळ उपस्थित होते.

यावेळी भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना भाजीपाला लागवडी विषयी माहिती देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 22-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here