जिल्ह्यात 222 नवे कोरोना बाधित; 3 जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 719 अहवालांमध्ये 222 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचारखाली असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 313 ऍक्टिव्ह रुग्ण असून यापैकी 1 हजार 34 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 78 हजार 730 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.31 टक्के आहे. नव्याने 222 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 82 हजार 601 इतकी झाली आहे. 

नव्याने तीन मृत्यूची नोंद करण्यात आल्याने आतापर्यंत 2 हजार 501 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 1 हजार 34 तर संस्थात्मक विलीगिकरणात 279 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:09 PM 22-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here