रत्नागिरी : सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येतून सलग दुसऱ्या दिवशी दिलासा मिळाला. सोमवारी आलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्येत मोठी घट झाली. जिल्ह्यात 24 तासात 146 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 215 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 79 हजार 190 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.52 टक्के आहे. नव्याने 146 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 82 हजार 902 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 502 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.2 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 882 तर संस्थात्मक विलगीकरणात 315 रुग्ण उपचार घेत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:27 PM 24-Jan-22