रत्नागिरी : येथील टीआरपी आदिनाथ नगरमध्ये चार इमारतींचे काम पूर्ण होऊन गेल्या दोन वर्षांपासून सोसायटीचा वापर सुरू आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एस.टी. पी. प्लांट अद्यापही अर्धवट स्थितीत असल्याने दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी हे काम पूर्ण होईपर्यंत उर्वरित नवीन इमारतीच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याची नोटीस प्रांताधिकारी यांनी अरिहंत कन्स्ट्रक्शनला दिली होती.
मात्र, ही स्थगिती उठवण्यात आली असली तरी तेथील रहिवाशांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. परिणामी या विविध मागण्यांसाठी सर्व रहिवासी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सोमवारी राहिवाशांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 25-Jan-22