देशाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात : राहुल पंडित

0

रत्नागिरी : भारतातील प्रत्येक मतदार नागरिकाने मतदानाचा अधिकार ओळखून आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. तरुण पिढीच्या हातात देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले.

पंडित देव- घैसास- कीर महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग, निवडणूक साक्षरता मंडळ विभाग, समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आभासी कार्यक्रमात बोलत होते.

महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील म्हणाल्या, मतदानाचा हक्क भारतीय संविधानाने दिलेला आहे. तो आपण कर्तव्यदक्ष राहून योग्य उमेदवारास मत देऊन बजावला पाहिजे. विद्यार्थी, प्राध्यापक यांनी प्रश्न विचारले. त्याची उत्तरे देऊन पंडित यांनी शंकानिरसन केले. मतदार दिनानिमित्त पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. त्यात हेमांगी गोताड आणि वैष्णवी बाणे यांनी यश संपादन केले. महाविद्यालयाचा सचिव (जीएस) म्हणून तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या प्रतीक माटेल या विद्यार्थ्याची निवड झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:25 PM 28-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here