मुंबई : कोविड नियमावलीअंतर्गत 1 फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता 50 टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. कोरोनाची सुधारित स्थिती पाहता रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश ‘अ’ वर्गवारीत करण्यात आला आहे.
राज्यात कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर ठाकरे सरकारने 10 जानेवारीपासून निर्बंध जारी केले होते. कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा निर्बंध शिथिल केले आहेत. 1 फेब्रुवारी 2022 पासून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश लागू होणार आहेत. राज्यातील राष्ट्रीय उद्याने, सफारी नियमित वेळेनुसार सुरू होणार असून ज्या पर्यटनस्थळांवर तिकीट आहे ती देखील सुरू होणार आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार, 50 टक्के क्षमतेची परवानगी मिळाली असून लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 200 व्यक्तींपुरती मर्यादित असेल. मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार. सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. राज्यातील थिएटर फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. स्विमिंग पूल, स्पा, जिम सुरू राहणार असून मुंबई लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
कोरोनाची स्थिती पाहून दर आठवड्याला अ वर्गवारीतील जिल्ह्यांची यादी अपडेट केली जाईल. या यादीचे निकषही परिस्थितीनुसार बदलले जातील. अ वर्गवारीत मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर आणि चंद्रपूर या 11 जिल्ह्यांचा ‘अ’ वर्गात समावेश. 18 वर्षांवरील 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस आणि 70 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा अ वर्गात समावेश करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 01-Feb-22