राजापूरात जंगलमय भागात एकजण रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने खळबळ

0

राजापूर : राजापूर तालुक्यातील जंगलमय भागात एकजण जखमी अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असून जखमी तरुणाच्या डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राजापूर तालुक्यातील केळवडे येथील दिपक उर्फ बाबू गुरव हे शुक्रवारी सकाळी जंगलात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बंदुकीच्या गोळ्या लागून ते जखमी झाल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केळवडे येथील दिपक गुरव हे शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गुरे घेऊन बागेत चरायला सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही वेळाने शेतात कामासाठी जाणाऱ्या महिलांना ते जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वाडीतील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी राजापूर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले.

दरम्यान, त्यांच्या डोक्याला बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी राजापूर पोलिसांना संपर्क साधत या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर आपल्या टिमसह केळवडे गावात तपासासाठी दाखल झाले असून सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता. त्यामुळे या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:17 AM 05-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here