हॉटेल्स रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0

रत्नागिरी : कोरोनाची साथ जिल्हयात झपाट्याने कमी होत असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीच्या आदेशात शिथिलता देताना अनेक उपक्रम सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. ग्राहकांसाठी हॉटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडा बाजारासह अनेक व्यवसाय सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र ग्राहकांसाठी हॉटेलचे दरवाजे रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवले आहेत. त्यानंतर हॉटेलमधून होम डिलिव्हरीची सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेलसाठी ५० टक्के क्षमतेला परवानगी दिली आहे. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जमाव बंदी आदेशाची बंदी उठवण्यात आलेली असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना किमान रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना देताना असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, सुनील देसाई, सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, गणेश धुरी आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:00 AM 05-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here