नवी दिल्ली: आमचा एखादा पराभव जरी झाला तर आम्ही अनेक महिने त्यावर चिंतन करतोय, पण काँग्रेसचा एवढ्या वेळा पराभव झाला तरी त्यांचा अहंकार जात नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.
देशातल्या अनेक भागात काँग्रेसला गेल्या अनेक वर्षांमध्ये सत्ता मिळाली नाही असंही ते म्हणाले. पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर त्यांनी चांगलीच टीका केली.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये काही बदल झाला आणि एक नवीन वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित झाली. त्यानंतर जग बदललं. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा जग नव्या वर्ल्ड ऑर्डरच्या दिशेने प्रवास करत असून जगामध्ये बदलाचं वारं वाहत आहे. ही संधी भारताने आपल्या हातून सोडू नये, भारताला एक महत्त्वाचा देश म्हणून उभारणं गरजेचं आहे. देशाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी आपण काही संकल्प केल्यास, पूर्ण शक्तीने काम केल्यास त्याचा परिणाम सकारात्मक होईल असं प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:59 PM 07-Feb-22