मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आमदार अॅड. आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी

0

नाणार प्रकरणी सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री बोलवावी, ज्यामध्ये स्थानिक रहिवाशांना ही बोलवावे आणि त्यानंतर नाणारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बुधवार दि. ४ रोजी विधानसभेत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. कोकणाबाबत विधानसभेत चर्चा झाली त्यामध्ये आमदार शेलार यांनी कोकणातील अनेक विषयांवर सरकारचे लक्ष वेधले. अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी आग्रही मागणी केली. यावेळी शेलार म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि फयान वादळ यामुळे कोकणातील ५२ हजार हेक्टर भाताची शेती सडली, काढलेला व सुकायला ठेवलेला भात सडला, मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. मच्छीमारांचा ७/१२ समुद्र आहे, या अवकाळी पावसात वादळात मच्छीमारांच्या नेट तुटल्या, बोटी तुटल्या त्यांचे मोठे नुकसान झाले, शेतकऱ्यांना देता त्या प्रमाणे हातावर पोट असणाऱ्या या मच्छीमारांचा ही सातबारा कोरा करा त्याला कर्जमाफी द्या, अशी मागणी विधानसभेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here