लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी व्हा, मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींचे ट्वीट

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. 11 जिल्ह्यांतील 58 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे.

या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांवर मतदान होणार आहे. मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन सर्व मतदारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असेही ते म्हणालेत. लक्षात ठेवा आधी मतदान करा मग अल्पोपहार घ्या असेही ते म्हणालेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया 7 टप्प्यात पार पडणार आहे. याातील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज 58 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासू सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या भागातील भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून भाजपने मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या निवडणुकीत एकत्र आले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश हा आरएलडीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, वडील अजित सिंह यांच्या निधनानंतर जयंत चौधरी यांची ही पहिलीच परीक्षा आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधून भाजप, बसपा आणि काँग्रेसने 58 उमेदवार उभे केले आहेत. तर समाजवादी पक्षाचे 28, आरएलडीचे 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार रिंगणात आहे. या तिन्ही पक्षांची युती आहे.

असे असतील मतदानाचे टप्पे
पहिला टप्पा – 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा – 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा – 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा – 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा – 27 फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा – 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा – 7 मार्च 2022 रोजी मतदान

आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून, पुढचा टप्पा हा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर शेवटचा मतदानाची प्रक्रिया ही 7 मार्चला पर पडणार आहे. या सर्व सत टप्प्यातील मतदानाचे निकाल हे 10 मार्चला लागणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:18 AM 10-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here