दिल्ली: चीनमध्ये थैमान घातल्यानंतर कोरोनाचा प्रसार जगभरामधील अनेक देशांमध्ये वाढत असून भारतातही २८ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्ली आणि परिसरामध्ये कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. पण मास्कचा मेडिकल स्टोअरमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे मास्कचा काळाबाजार सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.