रत्नागिरी : ओबीसीच्या न्याय्य हक्क अधिकारासाठी रत्नागिरीत येत्या १८ फेब्रुवारीला मोर्चा निघणार असल्याची माहिती ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी आणि ओबीसी कोकण विभाग अध्यक्ष अॅड. पल्लवी रेणके यांनी दिली.
ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन उभे करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिला आहे. त्याकरिता राज्यात १३ मोर्चे निघणार आहेत. त्यातील रत्नागिरीचा मोर्चा १८ फेब्रुवारीला निघणार आहे.
प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत, अशी माहिती पूर्वतयारी आणि आढावा बैठकीत काँग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी आणि ओबीसी कोकण विभाग अध्यक्ष अॅड. पल्लवी रेणके यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 12-Feb-22