गावात एसटी सुरू व्हाव्यात यासाठी मेघी ग्रामस्थांचे देवरूख आगाराला निवेदन

0

साखरपा : नजीकच्या मेघी गावातून जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू व्हाव्यात, यासाठी ग्रामस्थांनी देवरुख एसटी आगारात निवेदन दिले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यापासून मेघी गावातील एसटी फेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागातील फेऱ्या अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. मेघी हे गाव दुर्गम भागात असल्याने ज्येष्ठ नागरिक,रुग्ण, विद्यार्थी यांना दहा ते बारा किलोमीटर पायपीट करीत महामार्गावर एसटी मिळवावी लागते. याचा फायदा घेत रिक्षाचालकही मनमानी भाडी घेत आहेत. त्यामुळे आर्थिक भदंड बसत आहे. त्यामुळे गावातील एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी देवरुख आगारात निवेदन दिले.

यावेळी सरपंच प्रमिल चव्हाण, पोलिसपाटील रमेश बेटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बेटकर, माजी उपसरपंच रघुनाथ बेटकर, भरत बेटकर, चंद्रकांत पवार, दिलीप माने, मनोहर कांबळे, सुधाकर बेटकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:13 PM 12-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here