रत्नागिरी : समर्थ रंगभूमी रत्नागिरी या संस्थेतर्फे जिल्हापरिषद केंद्रशाळा डावखोल येथे ग्रामीण विभागातील
कलाकारांच्या कलागुणांना संधी मिळावी म्हणून एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
शाळेच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या “सुंदर मुख तुंदील तनु नंदिकेश्वरा…” या सुंदर नांदीने स्पर्धेची सुरुवात झाली. ९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धेमध्ये आर्या देसाई – प्रथम, प्राजक्ता बोमे -द्वितीय तर मृदुला बोमे हिने तृतीय क्रमांक पटकावला. रोख रक्कम, सन्मानपत्र, भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देवून, विजेत्यांसमवेत सहभागी झालेल्या सर्व विद्याथ्यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शहरापासून खूप दूर असलेल्या या मुलांमध्ये कलागुण आहेत. फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. डावखोल शाळेपासून आम्ही सुरुवात केलीय. यापुढे शक्य होईल अशा शाळेत स्पर्धा घेवू असे सांगून, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा जिल्हा पुरस्कार’ प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुशील जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल, श्रीफळ नटराजमूर्ती आणि पुष्पगुच्छ देवून संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सन्मान केला.
सदर वेळी प्रा.चंद्रमोहन देसाई यांनी मुलांना शैक्षणिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले. मुलांच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारून, त्याची उत्तरे मिळविली. प्रा.देसाई आणि सुहास साळवी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाला डावखोलचे सरपंच योगेश मुकादम तसेच संतोष जाधव,पालक, शिक्षक वृंद उपस्थित होते. अशोकराव सावंत यांचेही सहकार्य लाभले. मुख्याध्यापक सुशील जाधव यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रशांत जाधव यांनी आभार मानले आणि या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:51 PM 16-Feb-22