पुणे : मराठा समाज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त व्यक्तव्य करून विजय वडेट्टीवार दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आला.
समाजाला न्याय मिळावा यासाठी २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात खासदार संभाजीराजे आमरण उपोषणास बसणार आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुणे शहर जिल्ह्यातून हजारो बांधव जाणार आहेत. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी दोन्ही हातात तलवारी घेऊन वार कोणावर करणार? असे वादग्रस्त विधान करून स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दोन समाजात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वडेट्टीवार यांच्या या विधानाचा मराठा क्रांती मोर्चा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याची माहिती मोर्चाचे निमंत्रक राजेंद्र कोंढरे यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 18-Feb-22