एसटी संप : कंत्राटी पद्धतीवर १३ कर्मचारी कामावर रुजू

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील २२ फेब्रुवारीपासून एसटी वाहतूक काही प्रमाणात का होईना सुरळीत होणार असल्याची माहिती रत्नागिरी विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली.

कंत्राटी पध्दतीवर ५० कर्मचाऱ्यांची ऑर्डर गेल्या आठवड्यात काढण्यात आली होती. या पैकी १३ कर्मचारी हजर झाले असून, गुहागर डेपोमध्ये ६ तर रत्नागिरी आगारात ३ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

रत्नागिरी एस. टी. विभागाची वाहतूक सध्या १० ते १५ टक्केच सुरु आहे. ही संख्या वाढविण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. खासगी कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण होईल तसे हजर करुन घेतले जात आहे.

शुक्रवारी दि. १३ कर्मचारी हजर झाले आहेत. रत्नागिरी आणि गुहागर या ठिकाणी एसटी वेळापत्रक आवश्यक प्रमाणात सुरु नसल्याने या दोन आगारांत नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती रत्नागिरी विभागाने दिली.

दि. २२ फेब्रुवारीनंतर संपावर गेलेले काही कर्मचारीदेखील हजर होण्याची दाट शक्यता असल्याचीही माहिती रत्नागिरी एस.टी. विभागाने दिली. त्यामुळे आता संपातील किती कर्मचारी हजर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेले तीन महिन्यांपासून संपावरील कर्मचारी हजर होणार असल्याची माहिती वारंवार समोर आली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद कर्मचारी वर्गाकडून मिळाला नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here