वॅगनआर कार कोण जिंकणार? भव्य बक्षीस योजनेच्या तब्बल १० लाखांच्या बक्षिसांचे होणार वितरण

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित दसरा-दिवाळी-नाताळ या कालावधीसाठी भव्य बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेला रत्नागिरीतील ग्राहक वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला होता.

या बक्षीस योजनेत सुमारे ६ लाखांच्या बक्षिसांचे वितरण आजवर करण्यात आले असून दिनांक २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सोडतीत तब्बल १० लाखांच्या बक्षिसांचे वितरण होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व मान्यवरांच्या उपस्थितीत जयेश मंगल कार्यालय येथे २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी काढण्यात आलेल्या ५० भाग्यवान विजेत्यांमधून वॅगनआर कार नेमकी कुणाला लागणार याकडे सार्यांचे लक्ष आहे.

ऑनलाईन मार्केट ला टक्कर देण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने “भव्य बक्षीस योजनेचे” आयोजन केले होते. या योजनेत रत्नागिरी शहरातील सुमारे २०० दुकानदार सहभागी झाले होते. योजनेत सहभागी झालेल्या दुकानातून खरेदी केल्यावर ग्राहकांना एक कुपन देण्यात येत होते. याद्वारे लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळत होती.

सणासुदीला काढण्यात आलेल्या सोडतीत अपुर्वी सुमारे ६ लाखांच्या बक्षिसांचे वाटप ग्राहकात करण्यात आले असून आता अंतिम बक्षीस समारंभ २० फेब्रुवारी रोजी जयेश मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

अंतिम सोडतीसाठी निवडण्यात आलेल्या ५० भाग्यवान विजेत्यांना या कार्याक्रम्साठी निमंत्रित करण्यात आले असून अंतिम सोडतीसाठी या ग्राहकांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे महासंघाने कळवले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:50 AM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here