मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ०८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ आणि ८ जानेवारी व दि.०९ जानेवारी दि.३१ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अदयाप लागू आहेत.
त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेले निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही ०८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, दि .८ जानेवारी व दि.०९ जानेवारी दि. ३१ जानेवारी २०२२ या तारखांना निर्गमित केलेले आदेश अदयाप लागू आहेत. तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिबंधत्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 23-Feb-22