घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेचे पथक मार्चपूर्वीच कार्यरत

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच वसुली पथक कार्यरत झाले आहे. स्वतंत्र वाहनाच्या मदतीने रत्नागिरी न.प.चे पथक मंगळवारपासून कारवाईसाठी बाहेर पडले आहे.

कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीवर मर्यादा आल्या. त्यामुळे रनपच्या महसुलावर परिणाम झाला. थकीत कर वसुलीसाठी कोणतीही कडक कारवाई करता आली नाही. आता मात्र अशा कडक कारवाईचे नियोजन केले आहे. डिसेंबर महिन्यातच कर मागणीची बिले देण्यात आली आहेत. त्याचबरोबर थकीत करधारकांवर कारवाई करण्यात कोणतीही ढिलाई ठेवू नये, अशा सूचना मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी वसुली पथकाला केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:23 AM 23-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here