मागील सहा महिने जयगड बंदरात उभ्या असलेल्या इंजीन फेल झालेल्या जहाजातून डिझेल गळत असल्याने प्रदूषण होत असल्याची तक्रार मच्छीमारांनी केल्यानंतर याची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या जहाजाची सविस्तर माहिती द्या अशा सूचना बंदर विभागाला केली आहे. डिझेल गळत असल्याने मासेमारीला धोका निर्माण झाला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.