रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील फुटपाथसह अन्य अतिक्रमणे हटविण्याची मागणी भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी शहरातील गोखले नाका परिसरात खूप गर्दी असते. मात्र आगाशे कन्याशाळेपासून गोखले नाका, मारुती आळी, राम आळी परिसरात रस्त्यावर व्यावसायिक, व्यापारी यांनी अतिक्रमण केल्याने रहदारीची कोंडी होते. वाहने चालवणे तसेच पादचाऱ्यांना चालणे अशक्य होते. गोखले नाका ते आगाशे कन्या शाळा येथे झालेले अतिक्रमण पादचारी, वाहन चालक यांना खूप त्रासदायक होत आहे. मारुती आळी, राम आळी या परिसरातही या अतिक्रमणांचा त्रास होत आहे. रत्नागिरी पालिकेने हा विषय गांभीर्याने घेऊन असलेल्या अधिकारांचा वापर करून ही अतिक्रमणे तात्काळ हटवावीत. अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करीत आहे. आपण अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यतत्पर मुख्याधिकारी आहात. आपण रस्त्यात होणारी कोंडी लक्षात घेऊन कारवाई करून अतिक्रमणे हटवावीत, असे अॅड. पटवर्धन यांनी निवेदनात म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 01-Mar-22