हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

0

मुंबई : हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवाच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले आहे.
महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार यांचे स्नेहभोजन आणि बैठक अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी बुधवारी झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

ते म्हणाले की, आज सरकार पाडतो, उद्या सरकार पाडतो, असे काही जण म्हणताहेत. आमचे सरकार मजबूत आहे. १७० आमदार हे आमचे मोहरे आहेत. एकही जण कुठे जाणार नाही. आम्ही २५ वर्षे पाळलेले सापाचे पिल्लू आता वळवळ करत आहे, ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. दाऊदशी आमच्या लोकांचा संबंध जोडता. हिंमत असेल तर दाऊदला पकडून दाखवा. आम्हाला उगाच त्रास द्याल तर ते खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:40 AM 03-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here