रत्नागिरी : गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामीण वार्ताचे संपादक तथा युवा पत्रकार मुझम्मील काझी यांचा वैकुंठ प्रतिष्ठान, रेवाळेवाडी(तळेकांटे) यांच्यातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला आहे.
वैकुंठ प्रतिष्ठानतर्फे महाशिवरात्री निमित्त विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुझम्मील काझी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
मुझम्मील काझी यांच्या सामाजिक तसेच पत्रकारितेची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
कमी वयातच त्यांनी सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केली आहे.अनेक समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेत. कोरोना काळात सुद्धा उल्लेखनिय काम मुझम्मील काझी यांनी केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत वैकुंठ प्रतिष्ठान रेवाळेवाडी तर्फे तळेकांटे ग्रामपंचायत सदस्य राजु येद्रे यांच्या हस्ते पुष्प, श्रीफळ व पुस्तक भेट देत यथोचित सन्मान करण्यात आला.
या वेळी मंचावर उक्षी गावचे माजी पोलिस पाटील अनिल गुरव, शांताराम रेवाळे, चंद्रकांत रेवाळे सुभाष रेवाळे संभाजी कारकर, तुकाराम रेवाळे, प्रकाश रेवाळे, सुरेश रेवाळे, कार्यकारिणी सदस्य-दिपक रेवाळे, ज्ञानेश्वर रेवाळे, सिध्देश रेवाळे, स्वाती शिंदे, श्रेया रेवाळे हे उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 03-Mar-22