रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न अद्यापही रेल्वे प्रशासनाने सोडवलेले नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना न्याय न मिळाल्यास रेल रोको करण्याचा इशारा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी समितीला पाठिंबा देणाऱ्यांचेही आभार मानले.
कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने अनेक मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी १० वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे उपोषण आयोजित करण्यात आले होते. यावेळी कामगार सेना, शेतकरी कामगार संघटना, भारतीय जनता पार्टी वे केआरसीईयू संघटनांच्या प्रतिनिधींनी उपोषणाला बसलेल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना पाठिंबा दर्शवतानाआंदोलनात उतरण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे यांनी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांशी येऊन चर्चा केली व मागण्यांसंबंधी निवेदन स्वीकारले व संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी येत्या १५ दिवसांत व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे यांच्याबरोबर चर्चा करून मीटिंग लावण्याचे व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले.
आश्वासनानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय कृती समिती अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सदस्य सुरेश गावडे, वसंत धुरी यांच्यासह कृती समिती पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त यांनी घेतला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 09-Mar-22