‘उद्धव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत’

0

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या निवडणूक निकालाचे कल आता स्पष्ट झाले आहेत. ५ राज्यांपैकी ४ राज्यात भाजपा तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या जवळ पोहचला आहे. ५ राज्यांच्या निवडणूक निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले होते. त्यातच शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपाला बसू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. परंतु निवडणूक निकालावर फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आले.

भाजपाच्या विजयावर महाराष्ट्रातील भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक झालेल्या पाचपैकी चार राज्यात राज्यात आधीही भाजपाच होती आणि विरोधकांनी कितीही टीका केली, तरी आताही भाजपाच येणार आहे. हे यश परफॉर्मन्सचे आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:04 PM 10-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here