आंबा घाटातील अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

0

देवरूख : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील गायमुख जवळ गाडी ४०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात शनिवार दि. १२ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष हरकुडे आपल्या ताब्यातील गाडी घेऊन सांगली वरून गणपतीपुळेच्या दिशेने निघाला होता. गाडी आंबा घाटातील गायमुखजवळ आली असता, संतोष हरकुडे याचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट चारशे फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरुवारी घडला होता. या भीषण अपघातात शिवांश हरकुडे, सृष्टी संतोष हरकुडे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात संतोष हरकुडे, दीप्ती फुलारे, प्रताप तपस्ते, रेयान सुभेदार, आद्या फुळारे, तन्मिना हरकुडे हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघात प्रकरणी चालक संतोष नागप्‍पा हरकुडे याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात शनिवार दि. १२ मार्च रोजी भारतीय दंड विधानकायदा कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 14-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here