रत्नागिरी : मागील दोन वर्षापासून रत्नागिरी करांच्या मानेवर बसलेलं कोरोनाचे भूत आता होळीच्या मुहूर्तावर गायब झाल्याचे दिसतंय. सुमारे वर्षभरानंतर आज कोरोना पॉझिटिव्ह रुगांची संख्या शून्य झाली आहे. आजवर ८४,४६३ जण कोरोनाने बाधित झाले. यापैकी २५३४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आज आलेला कोरोना अहवाल अत्यंत दिलासादायक आहे.
१५ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंतच्या अहवालात ३५४ जणांचे स्वाब घेतले मात्र यापैकी एकही जण कोरोना संसर्ग झाला नसल्याचे आढळले आहे. या होळीत कोरोनाचा संपूर्ण नाश होऊनदे रे महाराजा हीच प्रार्थना आता श्री देव भैरी चरणी करायला हवी.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:03 PM 15-Mar-22