रत्नागिरी येथील नगर परिषद आवारातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी नव्याने पट्ट्यांची आखणी करण्यात आली. मात्र वाहन चालकांनी नो पार्किंग भागातच गाड्या लावून सूचनांना हरताळ फासले आहे. चारचाकी गाड्या नगर परिषद मुख्य गेटपर्यंत येत नसल्याने नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाकडून पर्किंगाबाबत कोणतेही धोरण ठरवले जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.