लांजा येथील आश्रमात गतिमंद मुलाच्या हल्ल्यामध्ये तीन महिन्याचा चिमुकलीला जीव गमवावा लागला. एका गतिमंद मुलाने तिला लादीवर आपटल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आश्रमातील यंत्रणाच्या हलगर्जीपणा याला कारणीभूत असला तरी पंधरा दिवस होऊनही महिला बालविकास समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना या गंभीर प्रकाराची आश्रमाने पुसटशीही कल्पनाही दिलेली नाही. पत्रकारांनी हा सारा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.