रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून रस्त्यालगतच्या चरीत ट्रक गेल्याने अपघात झाला. या प्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना शुक्रवार, (दि.१८) रोजी रात्री ११ वा. हातखंबा येथे घडली.
नागनाथ महादेव आवताडे (४२, रा. मंगळवेढा, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात संजय पांडुरंग कोळी (४२, रा.चडचन, विजापूर) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार शुक्रवारी रात्री तो आपल्या ताब्यातील ट्रक (१२-केपी-७३२६) घेऊन पाली ते हातखंबा असा भरधाव वेगाने येत होता. तो गुरववाडी येथील उतारात आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यालगतच्या चरीत गेल्याने हा अपघात झाला. यात त्याला दुखापत झाली असून ट्रक आणि त्यामधील मालाचे नुकसान झाले होते. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार वाजे करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:55 PM 21-Mar-22