रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात २३ मार्च २०२२ रोजी आयक्यूएसी विभाग व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, भूगोल विभागप्रमुख सौ ऋतुजा भोवड, सर्व शाखांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक हवामान बदल, अरबी समुद्रातील चक्रीवादळाची वारंवारता,जागतिक तापमान वाढ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. जागतिक हवामान बदल परिणाम व आपली भूमिका या विषयावर पीपीटी दाखविण्यात आली.जागतिक हवामान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रक तयार केली. त्याचे अनावरण प्रभारी प्राचार्या सौ मधुरा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागप्रमुख सौ ऋतुजा भोवड यांनी केले तर प्रा हरेश केळकर यांनी आभार मानले. तांत्रिक सहाय्य प्रा विनय कलमकर यांनी केले.कार्यक्रमाला विशेष सहकार्य समाजशास्त्र, इतिहास, भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले.प्राध्यापक वर्गात हरेश केळकर, वैभव कीर, वैभव घाणेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 23-Mar-22