जिल्ह्यात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी एकही रुग्ण सापडलेला नाही. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे. 

नव्याने एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. आतापर्यंत 81 हजार 932 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 97 टक्के आहे.

नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 466 इतकी स्थिर आहे. जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:54 PM 23-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here