आमदारांना मोफत घरं नको हे माझे वैयक्तिक मत, मात्र निर्णय महाविकास आघाडीचा : शरद पवार

0

मुंबई : मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात केली.

यानंतर या निर्णयावरुन अनेक मतमतांतर येत आहेत. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आमदारांना घरे देण्याचा महविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरे द्यायला नकोत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या, अशी पवारांची भूमिका आहे. लवकरच शरद पवार या विषयवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शरद पवारांचा सरकाराला घरचा आहेर अशी विरोधकांची टीका होत आहे, या टीकेला मी किंमत देत नाही, असे देखील शरद पवारांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. म्हाडात सर्वसामान्यांना घरं लागत नाही, अनेक प्रश्न प्रलंबित आहे, आमदारांची कोट्यावधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7-8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या बेघर किंवा मुंबईत घर बांधण्याची ऐपत नसलेले किती आमदार, खासदार असतील राज्यात? गावाकडे बंगले, आमदार-खासदारांच्या हौसिंग सोसायट्या, आमदार निवास एवढंच नाही तर म्हाडा लॉटरीत आरक्षण असतानाही वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:22 PM 29-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here