कुंभार्ली येथे आत्मा योजनेतंर्गत भाजीपाला प्रात्यक्षिके

0

चिपळूण : रासायनिक खताचा व किटकनाशकाचा अतिवापर झाल्याने त्याचा विपरीत परिणाम शेतीमध्ये व मानवी शरीरावर होत आहे. या रासायनिक कीटकनाशक व खताचा वापर कमी करणे व त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारणे हा दृष्टिकोन ठेवून सेंद्रीय व जैविक खताचा वापर यासाठी भाजीपाला पिकांमध्ये तालुका कृषि अधिकारी चिपळूण यांचे मार्फत आत्मा योजनेअंतर्गत कुंभार्ली येथे भाजीपाला प्रात्यक्षिके राबवण्यात आली.

या प्रात्यक्षिकांतर्गत शेतकऱ्यांना जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्यात आला. यामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा पर्याय सेंद्रिय व जैविक कीटकनाशकांचा पर्याय देण्यात आला. यासाठी निमार्क या वनस्पतीजन्य सेंद्रिय कीटकनाशक व व्हर्टिसिलियम या जैविक कीटनाशकाचा वापर व बुरशीजन्य रोगासाठी ट्रायकोडमार्कचा वापर करण्यास करण्यास शेतकऱ्यांना सांगण्यात आले. याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर प्रात्यक्षिक क्षेत्रावर करण्यात आला. कलिंगड व काकडी पिकामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो यासाठी फळ माशी चे कामगंध सापळे वापरण्यात आले.

कीड नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांमुळे रासायनिक कीटकनाशक फवारणी करण्याची गरज खूप कमी झाली. वारेमाप रासायनिक खताच्या वापरामुळे जैवविविधता देखील नष्ट होत आहे झाडांना जमिनीमध्ये अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम विविध जीवाणू जमिनीमध्ये करत असतात त्यांची संख्या कमी झाल्यामुळे जमिनी निर्जीव होत चालल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करणे अनिवार्य आहे. ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी नत्र स्फुरद व पालाश जीवाणू कल्चर शेतकऱ्यांना देऊन जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी पर्यायाने जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी या कल्चरचा वापर करण्यात आला. मौजे कुंभार्ली येथे श्री बाबू भागोजी शेळके या शेतकऱ्याकडे मल्चिंगचा वापर करून काकडी दोडका भेंडी मिरची कारली या पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

बाबू शेळके हा तरुण स्वतः पदवीधर असून स्वतः पिकवलेला भाजीपाला खेर्डी चिपळूण या भागामध्ये प्रत्येक अपारमेंट मध्ये जाऊन भाजीपाला स्वतः विक्री करतो. आणि संपूर्ण कुटुंब शेती तून येणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करतो. दुसरे प्रात्यक्षिक निलेश गजानन कोलगे यांच्याकडे कलिंगड पिकासाठी घेण्यात आले. येथे देखील मल्चिंगचा वापर करून उत्पन्न घेण्यात आले. कलिंगड लागवड ही त्यांनी पहिल्यांदाच केली होती. या प्रात्यक्षिकातून त्यांना 14 टन उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.तिसरे प्रात्यक्षिक सुभाष बाळकृष्ण कुंभार यांचे प्रक्षेत्रावर मिश्र भाजीपाला म्हणून घेण्यात आले.सुभाष कुंभार यांचे पूर्ण कुटुंब शेतीमध्ये काम करून मुलगा पदवीधर असून शेतात पिकलेला भाजीपाला सायंकाळी शिरगाव बाजार पेठ मध्ये स्वतः विक्री करतो. या सर्वांना कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी कृषी सहाय्यक दादासो. खारतोडे, आत्मा योजनेचे बीटीएम पंकज कोरडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 31-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here