रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा एसटी आगारांचे काम रखडले आहे. त्याबाबत चिपळूणचे अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
चिपळूण, लांजा व रत्नागिरी या एसटी आगारांच्या उभारणीचे काम २०१७ पासून रखडले आहे. यामुळे एसटी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणचे सुपुत्र व उच्च न्यायालयाचे वकील ओवस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यातिन्ही आगारांचे काम पूर्ण होण्यासाठी आता न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार श्री. पेचकर यांनी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून अॅड. पेचकर यांनी एसटी महामंडळ व ठेकेदार यांना यासाठी जबाबदार ठरविले आहे. २०१७ मध्ये या आगारांच्या उभारणीसाठी कामाचा आदेश देण्यात आला. रत्नागिरी आगाराचे काम दहा कोटींचे असून त्यासाठी ३६ महिन्यांची मुदत होती. चिपळूण आगाराचे काम ३.८० कोटी व लांजा आगाराचे काम दीड कोटींचे असून या कामांसाठी प्रत्येकी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. चिपळूण आगाराचा ठेका स्कायलार्क, रत्नागिरी आगाराचा ठेका दत्तप्रसाद तर लांजा आगाराचा ठेका एसपी एजन्सीला देण्यात आला आहे. अद्यापही या कामांना सुरुवात झालेली नाही. चिपळूण आगाराच्या कामाला सुरुवात झाली. केवळ पाया रचला गेला. आता हे काम बंद असून त्यावर गवत व झाडे उगवली आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:51 PM 31-Mar-22