नागपूर | महाराष्ट्रात आमचं सरकार असेपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला धक्काही लागणार नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यात खुल्या प्रवर्गावर अन्याय होवू न देता सगळ्यांना संरक्षण दिलं जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. ओबीसीची आकडेवारी सरकारकडे नसल्याचा विरोधकांनी केलेला आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळला आहे. दरम्यान, राज्यात ओबीसीसाठी 27 टक्के आरक्षण देण्याचं सरकारने ठरवलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
