कंपनीकडे खंडणी मागणाऱ्यास अटक

0

रत्नागिरी : न्यू इंडिया एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिसमध्ये जाऊन कंपनीच्या संचालकांना धमकी व खंडणी मागणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी १० एप्रिल रोजी महाड येथून अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नीलेश रवींद्र विचारे (रा.पालघर) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना २०११ सालातील असून नीलेश याने न्यू इंडीया एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य मंदिर येथील कंपनीत जाऊन तेथील सर्व कर्मचाऱ्यांना बंदिस्त केले होते. तसेच सामानाची हलवाहलवी करत कंपनीच्या संचालकाला धमकी देत २ लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे संचालकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

या प्रकरणी पोलिसांनी २०१२ साली त्याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर न राहिल्यामुळे तो नजरेआड गेला होता. नीलेश याला न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. शहर पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे नीलेश महाडमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. या अटक वॉरंटद्वारे पोलिसांनी नीलेशला १० वर्षांनी पुन्हा रविवारी रात्री अटक केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 13-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here