रत्नागिरीत सोमवारपासून एसटीचे नियमित वेळापत्रक सुरू होण्याची शक्यता

0

रत्नागिरी : गेल्या पाच महिन्यांहून अधिक कालावधी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर बुधवारी सुटला. रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील पूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार १०० टक्के फेऱ्या लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारपासून एसटीचे वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून संप पुकारला होता. या संपात रत्नागिरी विभागातील तीन हजारहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यानच्या कालावधी यातील १ हजार कर्मचारी कामावर हजर झाले. आता न्यायालयाने विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करून पगारवाढ देण्यात येईल, त्यामुळे कोणतीही न कारवाई करता हजर करून घ्या, असे सांगितले आहे.

त्यामुळे रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. सध्या ९९६ कर्मचारी कामावर हजर आहेत. लवकरच १ हजाराहून अधिक कर्मचारी हजर होतील, अशी अपेक्षा आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 15-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here