संपामुळे अद्याप १९० एसटी बसेसचे पासिंग होणे शिल्लक

0

रत्नागिरी : गेल्या चार महिन्यांहून अधिक कालावधी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यामुळे एसटीचे यावर्षीचे पासिंग वेळेत झालेले नाहीत. पासिंग गतीने करून घेण्याचे काम एसटी विभागाने आरटीओ यांच्या सहकार्याने सुरू केले आहे. तरीदेखील अद्याप १९० एस.टी.चे पासिंग होणे शिल्लक असल्याची माहिती रत्नागिरी एस.टी. प्रशासनाने दिली.

आगारातील एस.टी.चे दरवर्षी पासिंग करावे लागते. कोरोना काळातही वेळेवर पासिंग करुन घेण्यात आले होते. मात्र, यंदा संपाच्या दिरंगाईमुळे पासिंगचे कामात अडचणी आल्या. कारण जवळपास ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी होते.

या गाड्या पासिंगसाठी चालकच घेवून जात असतात. गाड्या नेण्यासाठी चालकच नव्हते. आता पासिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. आता संप मागे घेण्यात आला असला तरी सोमवारी सर्व कर्मचारी कामावर हजर होणार आहे. गाड्यांचे पासिंग वेळेत झाले नाही म्हणून वेळापत्रकात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे यामध्ये कोणत्याही अडचणी येवू नये, यासाठी आरटीओकडून सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 16-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here