रत्नागिरी: अजून पर्यंत शासकीय यंत्रणेचा रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाशी कोरोना संदर्भात बाजार पेठ बंद ठेवणेबाबत विचार विनिमय झालेला नाही. या रोगाचे भयानक परिणाम लक्षात घेता या संदर्भात शासकीय यंत्रणेला सर्वतोपरी मदत करणेस व्यापारी संघटना तयार आहे. आता पर्यंत सर्व प्रकारच्या प्रचार माध्यमांद्वारे सदर रोगाची लक्षणे लोकांनपर्यंत पोहोचवली आहेत. अशा प्रकारची लक्षणे कोणा व्यक्तीला स्वत:च्या प्रकृती संदर्भात ज्ञात झाली तर त्यांनी समाजामध्ये न वावरता आपणहून पुढे होऊन वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधून उपचारासाठी दाखल व्हावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे निवेदन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष उदय भा. पेठे यांनी केले आहे.