रत्नागिरी एसटी विभागात कर्मचाऱ्यांची 100 टक्के हजेरी

0

रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागात आता १०० टक्के कर्मचारी संपातून हजर झाले असून आता काही गाड्यांचे पासिंग होणे बाकी आहे; अन्यथा १०० टक्के वेळापत्रक सुरू झाले असते, अशी माहिती रत्नागिरी एस.टी. विभागाकडून देण्यात आली.

अखेर पाच महिन्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात संप मागे घेतला. मात्र, गेले आठ दिवसांत हजर होण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात गेल्याने आता ही प्रक्रिया पूर्ण होऊन साडेतीन हजार कर्मचारी हजर झाले आहेत. यातील केवळ आठजण हजर झालेले नाहीत. ते येत्या दोन दिवसात हजर होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हे आठजण मुंबई येथील एस.टी.च्या कर्मचाऱ्यांसोबत संपात सहभागी झाले होते. त्या नंतर ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला झाल्यानंतर आंदोलनात सहभागी सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात या कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे ते हजर होऊ शकले नाही. येत्या दोन दिवसात हे ८ कर्मचारीही हजर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अद्यापही गाड्यांच्या परिवहन विभागाकडील पासिंगचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला नाही. मात्र टप्याटप्याने हाही विषय मार्गी लागेल वेळापत्रकात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास एस.टी. प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 26-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here