मन शांत करण्यासाठी फडणवीसांनी ‘हा’ उपाय करावा : संजय राऊत

0

मुंबई : हनुमान चालिसेवरुन राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करणाऱ्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यानंतर भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जातीये. यातच आता संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीये. ”देवेंद्र फडणवीस यांचे मन अशांत आहे, त्यांनी हनुमान चालीसा पठण करावी,” असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, ”मी पुन्हा येईन, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. पुढची 25 वर्षे त्यांची सत्ता येऊ शकणार नाही. त्यामुळेच त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांचे मन अशांत झाले आहे, अशा अशांत मनावर एकच उपचार आहे, तो म्हणजे फडणवीसांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी. त्यामुळे फडणवीसांचे मन शांत होईल,” असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाचा दाखला देखील दिला. “शरद पवारांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. सरकार येऊ शकलं नाही म्हणून जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती फडणसींच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहे. सत्ता न आल्यानं निर्माण झालेल अस्वस्थता त्यांनी घरात बसून हनुमान चालीसा म्हणून मन शांत करावं”, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. “एक माथेफिरू सध्या ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत जगभर फिरत असेल तर अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 26-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here