राधाकृष्ण पत संस्थेचे कर्मचारी विलास कोलते यांचा निरोप समारंभ संपन्न

0

रत्नागिरी : तालुक्यातील नामांकित पतसंस्था म्हणून ओळख असणाऱ्या राधाकृष्ण पत संस्थेतील कर्मचारी विलास मुरलीधर कोलते हे आज सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी संस्थेच्या कार्यालयात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संस्थेच्या प्राधिकृत मंडळाचे प्रमुख हेमंत वणजु, सदस्य सौरभ मलुष्टे, मिलिंद दळी, मार्गदर्शक व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेशशेठ भिंगार्डे, राधाकृष्ण मंदिर संस्थेचे सचिव मकरंद खातू, पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक विजय साळुंखे, प्रथमेश पाथरे, अनुजा सावंत, राजेंद्र शिंदे, शिवानी खानविलकर, प्रशांत नाचणकर उपस्थित होते.

विलास कोलते यांनी सुमारे २५ वर्ष राधाकृष्ण पत संस्थेत आपली सेवा बजावली. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी आपली नोकरी केली. याच निरोप समारंभाच्या वेळी इतर कर्मचाऱ्यांना देखील पगारवाढीची भेट देण्यात आली. अत्यंत गतिमान कारभार करीत नवनवीन कर्ज व ठेव योजना पत संस्थेच्या वतीने आता राबवण्यात येत आहेत. संस्थेच्या या योजनांचा जास्तीतजास्त प्रचार व प्रसार करून ग्राहकांना चांगली व तत्पर सेवा द्यावी असे आवाहन प्राधिकृत मंडळाचे प्रमुख हेमंत वणजु यांनी यावेळी बोलताना केले व निवृत्त कर्मचारी कोलते यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:54 PM 29-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here