सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आज राजापूर दौऱ्यावर

0

राजापूर : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे शनिवार, ३० एप्रिल रोजी राजापूर तालुका दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यावेळी तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत.

आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीनाथ पडळकर यांनी शेतकरी, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, कामगार, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा’ हे राज्यव्यापी अभियान सुरू केले आहे.

या अभियानाअनुषंगाने ते ३० एप्रिल रोजी ते राजापूर तालुका दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी ८ वाजता तुळसवडे येथे आक्रोश यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. सकाळी १० वा. गोवळ येथील सेंद्रिय शेतीची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुपारी १२ वाजता पांगरेबुद्रुक व तेरा गावांच्या प्रादेशीक नळपाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता काजिर्डी येथे जामदा प्रकल्पग्रस्तांशी संवाद व जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:19 AM 30-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here