रत्नागिरी : १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून ३ मे रोजी अक्षय तृतीय आणि ईद हे दोन महत्वाचे सण आहेत. हिंदू आणि मुस्लीम बांधव हे या सणाच्या दिवशी व त्यापूर्वी विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. कपडे, दागिने, किराणामाल आदी विविध वस्तूंची खरेदी या सणाच्या निमित्ताने केली जाते.
यामुळे या सणांच्या खरेदीच्या अनुषंगाने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवार दिनांक १ मे रोजी व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवणार असल्याची माहिती रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 30-Apr-22