”..त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज ठाकरेंना तत्काळ अटक करून राज्यात शांतता प्रस्थापित करावी” : प्रवीण गायकवाड

0

मुंबई : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रवासियांना भडकावत आहेत. शांत आणि सुखाने नांदत असलेल्या समाजाला हाती दगड घ्यायला लावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज ठाकरे यांना तात्काळ अटक करुन राज्यात शांतता प्रस्थापित करावी”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

महाराष्ट्रदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेतल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य सभा पार पडली. या सभेत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी आणि पवारांमुळेच राज्यात जातीयवादाला खतपाणी मिळालं, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तर पुरंदरेंच्या उतारवयात केवळ ब्राह्मण आहे म्हणून त्यांना पवारांनी छळलं, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. आज सकाळपासूनच राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रत्युत्तर देत आहेत, त्यांचे दावे खोडून काढत आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी थेट राज ठाकरेंच्या अटकेची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

“महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांना बहुजनवादी म्हणतात, जातीयवादी नाही. हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे भडकावणाऱ्यांना जातीयवादी म्हटलं जातं. जे राज ठाकरे आहेत. राज्य सरकारने राज ठाकरेंना अटक करावी, जी शासनाची जबाबदारी आहे की, समाजात अशांतता निर्माण करणाऱ्यांचा बिमोड केला पाहिजे”, अशी आक्रमक भूमिका प्रवीण गायकवाड यांनी मांडली.

“लोकांना असुरक्षित वाटत असताना राज ठाकरे वरचेवर अल्टीमेटम देत आहेत. उद्या ईद आहे. परवा ४ तारखेचं त्यांनी अल्टीमेटम दिलं आहे. जानेवारीपासून महाराष्ट्रात मी जवळपास सगळे जिल्हे फिरतोय. सगळीकडे अस्वस्थता आहे. शांतता निर्माण करणं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी राज ठाकरेंना अटक करुन सरकारने समाजात शांतता प्रस्थापित करावी”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:10 PM 02-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here