राणा दा आणि अंजलीबाईंचा पार पडला साखरपुडा

0

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ लोटला आहे.

या मालिकेला आणि या मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. मालिकेत राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशी ने साकारली होती तर अंजली पाठकची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधर ने निभावली होती. आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे, तुमची ही लाडकी खऱ्या आयुष्यात पत्नी पत्नी होणार आहेत. हो, हे खरंय हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, फायनली एंगेज. साखरपुड्यावेळी अक्षयाने पिच रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केलेला पाहायला मिळतो आहे. तिला मॅचिंग असा गेटअप हार्दिकनेही केला आहे. त्याने पिच रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:50 PM 04-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here