गुहागर : तालुक्यातील चिखली-कारूळ फाटा मार्गावरील रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने रस्त्याशेजारी टाकलेली खडी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणे अवघड बनले आहे.
पसरलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. चिखली-कारूळ फाटा मार्गावर नेहमीच वर्दळ असते. तळवली, परचुरी, पेवे, पांगारी, निगंडळ, वडद, विसापूर, कारुळ, मुंढर आदी गावांना जाण्यासाठी हा मार्ग असल्याने येथून नेहमीच वर्दळ असते. एसटी, खासगी गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. रस्त्यावर येत असलेली खडी धोकादायक बनत असून, दोन महिन्यांपूर्वी खडी टाकूनही ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे