‘असनी’ चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम नाही

0

रत्नागिरी : एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता, तर असनीच्या प्रभावाने पाऊस अशी विचित्र स्थिती कोकणात निर्माण झाली आहे. मोसमी पावसाला कोकणात दाखल होण्याला वीस दिवसांचा कालावधी असतानाच पूर्व मोसमी पावसाची वर्दी देणारा असनीचा हा प्रभाव असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्री वादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असताना बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी कोकणातील बहुतांश भागात हलका पाऊस झाला.

अंदमानात सक्रिय झालेल्या असनी चक्रीवादळाचा गुरूवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्यास सुरूवात झाल्यानंतर किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली.

जिल्हयात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री आणि गरुवारी पहाटे सहा वाजता हलक्या स्वरुपाच्या सरी झाल्या. काही भागात जोरदार पाऊसही झाला. गुरुवारी दिवसभर मळभी वातावरण होते. दुपारीही काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसाने पूर्व मोसमी पावसाला बळकटी मिळाली. मोसमी पावसालाही पोषक वातावरण तयार होण्यास पाठबळ मिळाले, असा संदेश हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात मळभी वातावरणाने तापमान खाली आले होते. पावसाळी वातावरणात कमाल तापमान ३० अंश सेल्सियस एवढे नोंदविले. बुधवारी रात्रीही तापमानात कमालीची घट होऊन उष्म्याचे प्रमाण कमी झाले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 13-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here